पोस्ट्स

वेतन आयोगाचे गुर्‍हाळ

##   वेतन आयोगाचे गुर्‍हाळ   ## नुकताच राज्य सरकारी तृतिय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांनी सातव्या वेतन आयोगासाठी तीन दिवस ( ७ , ८ व ९ आॅगष्ट २०१८ ) संप पुकारला. या संपातून कर्मचार्‍यांना सहानुभुतीपूर्वक विचार करण्याचे शासनाने दिलेले आश्वासन किती पाळणार हे वेळच ठरवेल. परंतु या संपाच्या निमित्ताने सर्वसामान्य जनतेत सरकारी कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग दिल्यास सरकारच्या तिजोरीवर किती बोजा पडेल हे पसरवण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. ( महाराष्ट्राच्या बिचार्‍या गरिब राज्यकर्त्यांनी स्वत:चे वेतन , भत्ते आणि पेन्शन वाढवून घेतले तेव्हा मात्र राज्याच्या तिजोरीवर कुठलाही बोजा पडला नाही. असो... ) कर्मचारी शासनाचा कणा कुठलेही शासन हे त्यांच्या कर्मचार्‍यांच्या जिवावर चालत असते. शासनाची ध्येय , धोरण , विविध लोकोपयोगी योजना प्रत्यक्षात राबवण्याचे आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला सेवा देण्याचे काम शासकिय कर्मचारी करत असतात. म्हणजेच शासनाचे मनुष्यबळ हेच शासनाचा कणा आहे. राज्यकर्ते बदलले तरी शासन सुरळित चालवण्याचे काम अधिकारी व कर्मचारी करत असतात. ज्या कण्याच्या जिवावर हे शासन चाल...

बोवा

##   बोवा   ## ( "बोवा" या माझ्या झाडीबोलीतील कथेतून ) रस्त्याना फटफटि ढकलत जाणार्‍या देवराम बोवाले रावजी हाका मारू लागला. " बोवा , इकळं येजाल. थोळा कुटाराचा पोतातं उचलु लागाजी. "  तसा बोवाना आपली फटफटी रावजीच्या डयलं बायेर लावून तो रावजीलं कुटाराचा पोता उचलु लागला. " कोटि चालल्यातं पैदल पैदल फटफटि ढकलत ?" रावजी कुटाराचा पोता धरून शिडीवर चंगत मनला. " चाललोजी बसटापवर गाळित पेट्रोल भरावलं." असा मनत बोवा आपली फटफटि ढकलत बसटापवर जावालं नयराच्या रस्त्यालं लागला. देवराम बोवा तसा कायी रावजीचा गनगोत नोय. तो होय , मोठ्या टोलीवरच्या सकरू गोंडाचा मंजला जवाई. बोवा जरी गोंडाचा जवाई असला तरी सार्‍या गावात अना गावातल्या घरा घरात त्याची उठबस होती. कोणालेबी तो आपलाच जवाई वाटे. देवराम बोवा मंजे गावबोवा............... गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)

शाळा..... नव्हे माझी प्रयोगशाळा

शाळा.....नव्हे माझी प्रयोगशाळा विद्यामंदिर बादेवाडी शाळा , माझ्या आयुष्यातील एक सोनेरी पान. मसाई पठाराच्या कुशीत वसलेलं एक छोटसं टुमदार गाव. माझ्या नोकरीची सुरूवात या छोट्याशा गावातील छोट्याशा शाळेतून झाली. सह्याद्रिच्या कुशीत , मसाई पठाराच्या पायथ्याशी वसलेल्या या छोट्याशा गावात तीन खोल्यांची विद्यामंदिर बादेवाडी ही छोटिशी जिल्हा परिषदेची इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतची शाळा. शाळेत चार वर्ग आणि दोन शिक्षक. प्रत्येकाने दोन दोन वर्ग सांभाळायचे. नोकरीची सुरूवातच अशा दुर्गम भागात झाल्याने आणि पूर्वानुभव पाठिशी नसल्याने पावला पावलावर परीस्थितीशी झगडावे लागले. चुकांमधुन शिकावे लागले. काम करत असताना हातून अनेक चुका होत होत्या पण त्या चुका पुढच्यावेळी सुधारत मार्गक्रमण करत गेलो. नोकरीच्या सुरूवातीला सर्व गोष्टि नविनच असल्याने प्रत्येक नविन काम करून बघणे , यशस्वी झालेल्या गोष्टिंची पुनरावृत्ती करत विद्यार्थ्यांमध्ये रूजवणे , या कारणाने हि शाळा माझ्यासाठी एक प्रयोगशाळाच ठरली. या प्रयोगशाळेत मी रोज नवनविन प्रयोग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यावर करत होतो. कधी मुलांच्या अभ्यासाव...

अपेक्षांचे ओझे

##   अपेक्षांचे ओझे  ## सकाळचे सात सव्वासात वाजले असतील , सुट्टिचा दिवस असल्याने आंघोळ करून चहाचा आस्वाद घेत मी खुर्चीत बसलो होतो. रेडिओवर सुमधुर भावगीतांचा कार्यक्रम सुरू होता. "जिवन गाणे गातच रावे , जिवन गाणे."  प्रसन्न सकाळी सुमधुर गितांनी आणखिनच प्रसन्न वाटत होते. अशात एकाएक माझा मोबाईल खणाणला. मी मोबाईल उचलुन बोलणार एवढ्यात मला समोरून आवाज आला ,  " सर , आपल्या गावातील " विक्रम " मरण पावला." समोरच्याचे बोलणे ऐकुन मला काहि सुचेनाच. मी त्यातच त्याला विचारायला लागलो , " हे असं अचानक कसं काय घडलं ? "  " सर , नोकरीच्या निराशेतून घरच्यांशी थोडा वाद होवून त्यानं आत्महत्या केली बघा." असं म्हणत पुढच्या व्यक्तीने मोबाईल ठेवला. सकाळी सकाळी मिळालेल्या या दु:खद वार्तेने सकाळचे प्रसन्न वातावरण दवबिंदु जसे सूर्यकिरणांच्या उष्णतेने क्षणात विरून जातात तसे क्षणार्धात हवेत विरून गेले. त्यात शेवटच्या वाक्याने मी सून्नच झालो. वीस बावीस वर्षाचा तरूण असं कसं करू शकतो ? तो एकदोनदा अपयशी झाला असेल , म्हणून काय झालं ! जगात शेकडोवेळा अपयश पचवत आपले ध...

जबाबदारी तुमची आमची

##  जबाबदारी.... तुमची....आमची  ## एप्रिल महिण्यात मी कोल्हापूरला राजारामपुरी पाचबंगला परिसरात फळांच्या दुकानात उभा असताना रेल्वे फाटकाजवळ अचानक धुराचे लोट आकाशात उठु लागल्याने परिसरातील सगळी जनता तिकडे बघु लागली. सुरूवातीला कुणीतरी कचरा पेटवला असेल असे समजुन मी तिकडे दुर्लक्ष केले. परंतु क्षणाक्षणाला वाढत जाणारा एवढा धुर साध्या कचर्‍याने निर्माण होणे शक्य नाही. हे लक्षात आल्यावर मी जवळ जावून बघितले तर कुणीतरी तिथे थर्माकाॅल पेटवून पसार झालेला होता. हा धुर जवळजवळ पंधरा मिनिटे आकाशाकडे धाव घेत होता. थर्माकाॅलची विल्हेवाट लावण्याची हि पध्दत आणि ठिकाण त्या महाभागाच्या असंवेदनशीलतेचे दर्शन घडवून गेली. भर वस्तीत एवढा वायू प्रदुषण करताना त्या महाभागाने कुठलाही विचार केला नव्हता हेच यातून प्रतित होत होते. कोल्हापूर शहरातील हा वर्दळिचा भाग. परीसरात रेल्वे स्टेशन , बसस्थानक तसेच दवाखाने आहेत. अशा ठिकाणी कचरा पेटवणं नक्कीच हितकारक नाही. अशा वस्तुंची विल्हेवाट लावणे सर्व सामान्यांसाठी खुप अवघड होवून बसत असले तरी ते भर रस्त्यावर पेटवून विल्हेवाट लावण्याचे कुणीही समर्थन करू शकत नाही. ...

रस्ता आणि प्रवास

रस्ता आणि प्रवास प्रवास........ प्रत्येकाच्या वाट्याला कमी अधिक प्रमाणात येतोच. कुठल्या न कुठल्या कारणाने प्रत्येकाला प्रवास करावा लागतो. प्रवासाला निघालेला प्रवाशाला रस्त्याने प्रवास करत असतानाना कधी चढ तर कधी उताराचा सामना करावा लागतो. प्रवासात अनोळखी रस्ता असल्यास तो कसा असेल याचा कुणालाच पत्ता नसतो. अनोळखी मार्गावर कुणी ओळखीचा भेटेल हेही सांगणे कठीणच ! असा अनोळखी रस्ता कधी काटाकुट्यांनी भरलेला तर कधी शितल छायेचाही असू शकतो. सगळेच रस्ते काही वळणावळणाचे नसतात. तसेच सगळेच रस्ते सरळही नसतात. वळणदार रस्त्यावर चालकाचे कसब पणाला लागत असते. वळण संपले कि सरळ रस्ता लागतोच लागतो. कधी कधी रस्ता बहुपदरीही असतो. त्यावर कधी वळण , कधी खाचखडगे तर कधी सरळ ! मानवी जिवनही असे अनेक पदरी रस्त्याप्रमाणे आहे. जिवनाच्या वाटेवर अनेक खाचखळगे , वळणे येतच असतात. अशावेळी मानसाच्या धैर्याचे कसब पणाला लागते. रस्त्यात येणारे खाचखळगे कायमच येत नसतात. या खाचखळग्यांना धैर्याने तोंड दिलं कि चांगला रस्ता सापडतो आणि जिवन प्रवास अधिक सुखकर होतो. वाट सरळ असो वा वळणावळणाची तिला कुठलीतरी दिशा नक्कीच असते. एका ठिकाण...

माया लावणारी माणसं

##  माया लावणारी माणसं  ## एका शिक्षकाच्या जिवनामध्ये विद्यार्थ्यांचं अस्तित्व जसं कधीही अस्ताला न जाणार्‍या सूर्यासारखं असतं , अगदि तसच पालकांचही असतं. शाळेचा संबंध केवळ विद्यार्थ्यांशीच नसतो. तर तो गावाशी आणि तेथील प्रत्येक पालकांशीही असतो. शाळेच्या गावात शिक्षक म्हणून वावरताना विद्यार्थी आणि पालक यांचा सारखा संपर्क येत असतो. यातून विद्यार्थी विकास आणि शाळाविकासाचा मार्ग प्रशस्त होत जातो. यातूनच काही न विसरता येणारी नातीही निर्माण होतात. या नात्यांना कोणतीही उपमा , नाव देता येत नाही. बादेवाडी / वेखंडवाडी सारख्या डोंगरकपारीतील शाळेत काम करत असताना अनेक चांगल्या , शुद्ध मनाच्या व्यक्तींचा सहवास मला लाभला. यामुळेच असेल कदाचित हि माणसे मला हाक मारताना बर्‍याचदा मी त्यांच्या गावच्या शाळेतील शिक्षक आहे हे विसरून जावून मी जणू त्यांच्या घरातील सदस्य असल्यासारखे मला वागणूक द्यायचे. हे त्यांचे निरपेक्ष प्रेम मला सर्व गोष्टिंपेक्षा श्रेष्ठ वाटते. अशाच एक आजी आपल्या नातवंडांच्या अभ्यासासंबधी अडचणी घेवून बर्‍याचदा शाळेत यायच्या. शाळेत आल्यावर आपल्या नातवंडांचा अभ्यास झाला नाही म्ह...